Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनवे नियम.. 'या' कारणामुळे रेशन कार्ड होणार बंद - नवीन कार्ड...

नवे नियम.. ‘या’ कारणामुळे रेशन कार्ड होणार बंद – नवीन कार्ड मंजूर करतांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी कडक पावले उचलली आहेत.जुलै २०२५ मध्ये केंद्र सरकारने “लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली(नियंत्रण)सुधारणा आदेश” अधिसूचित केला आहे.या नवीन नियमानुसार,ज्या कुटुंबांनी रेशन दुकानातून सलग ६ महिने धान्याची उचल केली नाही,तर अश्यांचे रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ म्हणजेच निष्क्रिय(बंद) केले जाईल.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळणारे लाभार्थीही या कक्षेत येणार आहेत.केवळ रेशन मोफत आहे म्हणून ते उचलले नाही, तरीही तुमचे कार्ड रद्द होण्याची टांगती तलवार असेल. आता केवळ रेशन कार्ड असणे पुरेसे नाही,तर दर पाच वर्षांनी तुमची पात्रता तपासली जाणार आहे.रेशन कार्डमधील पाच वर्षांखालील मुलांचा आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे.तसेच मुलांचे वय ५ वर्षे पूर्ण होताच त्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक असेल.जर एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोंद आढळली,तर ते कार्ड तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल आणि तपासणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.नवीन रेशन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेतही सरकारने बदल केले आहेत.यापुढे नवीन कार्ड मंजूर करतांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाचा वापर केला जाईल. प्रत्येक राज्याला आपल्या पोर्टलवर नवीन कार्डसाठीची प्रतीक्षा यादी जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!