Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीनटराज पुरस्कारासह चार पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित..

नटराज पुरस्कारासह चार पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्थापित महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार,नटराज पुरस्कार,विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रदान करण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.
सदर पुरस्कारांच्या माध्यमातून वीरशैव-लिंगायत समाजातील सामाजिक,कलात्मक,समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कारांच्या माध्यमातून समाजातील समाजसेवक,कलावंत,समाज संघटनात्मक कार्यकर्ते,आध्यात्मिक प्रबोधनकार तसेच साहित्यिक यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी,हा शासनाचा उद्देश आहे.
प्रत्येक पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्था अशा दोन्ही गटांतून पात्र उमेदवारांचा विचार करण्यात येणार असून, संबंधित क्षेत्रातील सातत्यपूर्ण,प्रभावी व समाजहिताचे कार्य करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
सन २०२५-२६ या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ असून,इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक,इतर मागास बहुजन कल्याण,गडचिरोली यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत रितसर अर्ज सादर करावेत.अर्जाचा नमुना संबंधित कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.सचिन मडावी, सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!