Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार तर एका जवानाला वीरगती...

नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार तर एका जवानाला वीरगती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगड राज्याच्या काही भागात नक्षली मोठ्या प्रमाणावर उपद्रव माजवित आहेत.दोन दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या चमूने संयुक्त कारवाई करीत ३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या इंदागाव ठाणा क्षेत्राच्या सोरनामाल जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक झाली होती. जवानांनी मोठा फौजफाटा घेऊन नक्षल्यांना हुसकावून लावत नक्षल्यांच्या शोध मोहिमेसाठी ३०० जवान रात्री उशिरा बाहेर पडले होते.त्यातच डीआरजी,एसटीएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी तीन नक्षल्यांना ठार केले होते.अशातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे; छत्तीसगडमधील अबुजमाडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे.चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाले असून एका जवानाला वीरगती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावरून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.त्यामध्ये एके-४७ रायफलसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.अबुजमाडमध्ये नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!