Monday, May 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदमदार पावसाची महाराष्ट्राला अजूनहीप्रतिक्षाच....विभागनिहाय पावसाची आकडेवारी…

दमदार पावसाची महाराष्ट्राला अजूनहीप्रतिक्षाच….विभागनिहाय पावसाची आकडेवारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्यात उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरतील असे वाटत होते. पण सध्या राज्यातील जलसाठा ६३.४८ टक्क्यांवरच असून मागील वर्षीच्या तुलनेत ही २० टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्रात २१, मराठवाड्यात १८,तर विदर्भात ९ टक्के तुटीचा पाऊस झाला.उरलेल्या पावसाळ्यात दमदार पावसाची आस कायम आहे.मात्र मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर मानली जात आहे.

राज्यात मान्सून आगमनानंतर वाटचाल चांगली झाली.पण अद्यापही धरणातील जलसाठा पुरेसा झालेला नाही.राज्यातील धरणक्षेत्र अजूनही कोरडेच आहे.जुनअखेर ते जुलै मध्यात आणि अखेरीस महाराष्ट्रात धो-धो बरसलेल्या पावसामुळे कुठे दरडी कोसळल्या तरी कुठे महापूर आले.यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, त्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा परतत नसल्याने राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

राज्यातील मोठे,मध्यम आणि लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती बघितली असता या प्रकल्पातील जलसाठा हा केवळ ६३.४८ टक्क्यांवर असून,मागील वर्षी तो याच तारखेला ८३.३४ टक्के होता.यंदा प्रकल्पात २० टक्के तूट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे धो-धो बरसलेल्या पावसानंतरही राज्यातील प्रकल्प ‘साठी’च गाठू शकल्याचे चित्र आहे.कोकण विभागात ९ टक्के जादा पाऊस झाल्याचे दिसत असून उर्वरित विभागात तुटीचा पाऊस आहे.

पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली:

विदर्भातील धरणांच्या जलसाठ्याची स्थिती बघता पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली आहे.अमरावती विभागात ६९.६१ टक्के जलसाठा आहे.अमरावती विभागातील २६१ प्रकल्पांची एकूण ३ हजार ७७४ दशलक्ष घनमीटर क्षमता असून २ हजार ६२७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. राज्यात सर्वाधिक जलसाठा असणाऱ्या नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांची एकूण ४ हजार ६०६ दलघमी जलसाठा क्षमता आहे. त्यात ३ हजार ५८१ दलघमी जलसाठा आहे.

मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर:

छत्रपती संभाजीनगर विभागात प्रकल्पामध्ये केवळ ३१.६१ टक्के जलसाठा असल्याची स्थिती असून, मागील वर्षी ती ७४.६४ टक्के एवढी होती.त्यामुळे आता जर पुढील दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.दरम्यान पावसाळ्याचे सुमारे ३ महिने उलटून गेले आहेत.आता पावसाळ्याचा केवळ एक महिना उरला असून,आता किती टक्के पाऊस पडतो आणि किती टक्के जलसाठा प्रकल्पांमध्ये साठवल्या जातो; यावर पुढील जलसाठ्याचे गणित ठरणार आहे.

प्रकल्पांची सध्यास्थीती;विभाग निहाय टक्केवारी :-

कोकण : ८८. २६

मराठवाडा : ३१.६१

नागपूर : ७७.७५

अमरावती : ६९.६१

नाशिक : ५८.६०

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!