Saturday, May 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'त्यांना' मिळाला; पण आम्हाला नाही मिळाला नं बोनस..! - अधिकाऱ्यांनी केला खुलासा..

‘त्यांना’ मिळाला; पण आम्हाला नाही मिळाला नं बोनस..! – अधिकाऱ्यांनी केला खुलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत राज्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाच्या बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री व ऑनलाईन केले अश्यांच्याच खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली आहे.त्यामुळे प्रत्यक्ष विक्री न करणाऱ्या व केवळ ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढून ‘त्यांना’ मिळाला; पण आम्हाला नाही मिळाला नं बोनस..! मागील कालावधित तर सर्वांनाच मिळाला होता नं बोनस..अशी चर्चा सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे.
शासनाने ई-पीकपेरा झालेल्या सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा अधिवेशनात केली होती.पण आता सर्वांना बोनस आलेला नाही.सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धान उत्पादकांना प्रोत्साहित राशी म्हणून बोनसची घोषणा केली होती.यापूर्वी प्रतिक्विंटल बोनस याच शासनाने दिला होता.मात्र,त्यात पुन्हा सुधारणा करीत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत सरसकट ई-पीकपेरा नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस मिळणार असे जाहीर केले.त्यामुळे धान उत्पादकांनी  आशा बाळगून खासगीत,खुल्या बाजारात किंवा उत्पन्न घटल्याने धान विकले नाही.त्यामुळे सर्वांना  बोनस मिळण्याची आशा होती.मात्र,ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री केली,अशा सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या पन्नास टक्के निधीतून बोनसचे वितरण करण्यात आले आहे.आदिवासी विकास विभागाकडे वेगवेगळ्या तीन याद्या तयार करण्यात आल्याची माहिती आहे.पहिल्या यादीनुसार सुरुवातीला बोनसचे वितरण झाले.यातच वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची दुसरी यादी,तर दोन्ही याद्यांमध्ये नावांचा समावेश नसलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी.ज्यांची कागदपत्रे बरोबर,त्यांच्या खात्यात बोनसची रक्कम,त्यानुसार बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे.अश्यातच ज्यांना बोनस मिळाला नाही,अश्यांच्या बाबतीत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी खुलासा केला की,सध्या तरी आधारभूत खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांनाच बोनसचे वाटप सुरू आहे.पुढे शासन स्तरावरून जसे आदेश येतील,त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल.म्हणजेच,पुढील शासानादेश आल्याशिवाय उर्वरित शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.विशेष म्हणजे,अगोदरच पन्नास टक्के निधी बोनसची रक्कम येण्यासाठी शेतकऱ्यांना सहा महिने वाट पाहावी लागली.यातच आता उर्वरित शेतकऱ्यांना बोनसस मिळणार की नाही? असा प्रश्न अनुत्तरित आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!