- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत राज्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाच्या बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री व ऑनलाईन केले अश्यांच्याच खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली आहे.त्यामुळे प्रत्यक्ष विक्री न करणाऱ्या व केवळ ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढून ‘त्यांना’ मिळाला; पण आम्हाला नाही मिळाला नं बोनस..! मागील कालावधित तर सर्वांनाच मिळाला होता नं बोनस..अशी चर्चा सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे.
शासनाने ई-पीकपेरा झालेल्या सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा अधिवेशनात केली होती.पण आता सर्वांना बोनस आलेला नाही.सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धान उत्पादकांना प्रोत्साहित राशी म्हणून बोनसची घोषणा केली होती.यापूर्वी प्रतिक्विंटल बोनस याच शासनाने दिला होता.मात्र,त्यात पुन्हा सुधारणा करीत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत सरसकट ई-पीकपेरा नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस मिळणार असे जाहीर केले.त्यामुळे धान उत्पादकांनी आशा बाळगून खासगीत,खुल्या बाजारात किंवा उत्पन्न घटल्याने धान विकले नाही.त्यामुळे सर्वांना बोनस मिळण्याची आशा होती.मात्र,ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री केली,अशा सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या पन्नास टक्के निधीतून बोनसचे वितरण करण्यात आले आहे.आदिवासी विकास विभागाकडे वेगवेगळ्या तीन याद्या तयार करण्यात आल्याची माहिती आहे.पहिल्या यादीनुसार सुरुवातीला बोनसचे वितरण झाले.यातच वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची दुसरी यादी,तर दोन्ही याद्यांमध्ये नावांचा समावेश नसलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी.ज्यांची कागदपत्रे बरोबर,त्यांच्या खात्यात बोनसची रक्कम,त्यानुसार बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे.अश्यातच ज्यांना बोनस मिळाला नाही,अश्यांच्या बाबतीत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी खुलासा केला की,सध्या तरी आधारभूत खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांनाच बोनसचे वाटप सुरू आहे.पुढे शासन स्तरावरून जसे आदेश येतील,त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल.म्हणजेच,पुढील शासानादेश आल्याशिवाय उर्वरित शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.विशेष म्हणजे,अगोदरच पन्नास टक्के निधी बोनसची रक्कम येण्यासाठी शेतकऱ्यांना सहा महिने वाट पाहावी लागली.यातच आता उर्वरित शेतकऱ्यांना बोनसस मिळणार की नाही? असा प्रश्न अनुत्तरित आहे.
- Advertisement -

