Tuesday, June 16, 2026
Homeदेसाईगंजतेंदुपाने खुट कटाई (प्रुनिंग) साठी जबाबदार कोण? - देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल...

तेंदुपाने खुट कटाई (प्रुनिंग) साठी जबाबदार कोण? – देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरातील प्रकार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात एक अनोखा प्रकार हल्ली निदर्शनास आला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वन विभागाच्या मते ‘प्रुनिंग’ म्हणजेच आपल्या भाषेत ज्याला तेंदुपाने खुट कटाई म्हणतो; अशी तेंदुपाने खुट कटाई कुणी केली याचा थांगपत्ताच लागेनासा झाला आहे.म्हणजे ‘खाकेत कळसा आणि गावाला वडसा’ असा प्रकार दिसून येत आहे.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचा असून याबाबत वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक यांना तक्रार करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

येत्या एक ते दीड महिन्यात तेंदुपाने संकलनास सुरुवात होणार असून तेंदुपाने संकलन करण्यापूर्वी मार्च महिन्यात टेंभूर्णीच्या छोटी-छोटी झाडांची खुट कटाई व किंचित मोठ्या झाडांची पाने छटाई म्हणजेच ‘प्रुनिंग’ करण्यात येते.यासाठी सर्वप्रथम वन विभागाच्या वतीने गावातील जी सर्कले निवडली जातात.अशा ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करून ग्रामसभेत तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी ठरावाची आवश्यकता असते.ग्रामसभेत वन विभागानेच तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबवावी; असे ठरल्यास त्यानुसार वन विभाग तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबवित असतो.काही ठिकाणी ग्रामपंचायती  पेसा कायद्या अंतर्गत स्वतः लिलाव प्रक्रिया राबवून ग्रामकोष समितीची निवड करून संपूर्ण तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबवित असतात.तर नॉन पेसा अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायती हात झटकून वन विभागाच्या स्वाधीन तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबविण्यास तसे ग्रामपंचायत मार्फतीने पत्रव्यवहार केला जातो.याला पर्याय एक व पर्याय दोन असे संबोधले जाते.

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गाव नॉन पेसा मध्ये येत असल्याने कित्तेकवेळा वन विभागाच्या मार्फतीनेच तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया करण्यात यावी; असा ग्रामसभेत ठराव घेऊन पत्रव्यवहार करण्यात येतो.मात्र नवलाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला कोंढाळा ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचे ग्रामसभेतील ठराव न देता व कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार न करता; कोंढाळा जंगल परिसरात टेंभूर्णीच्या छोटी-छोटी झाडांची खुट कटाई व किंचित मोठ्या झाडांची पाने छटाई म्हणजेच ‘प्रुनिंग’ करण्यात आली आहे.अशातच अशी ‘प्रुनिंग’ कुणी केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत देसाईगंज वन परिक्षेत्र कार्यालयाच्या ना वनाधिकाऱ्याला माहीत; ना क्षेत्र सहाय्यकाला; ना वनरक्षकाला याची माहिती नसल्याने जंगल परिसरात काय चालले आहे.कुणीही जंगल परिसरात जावे आणि लिलाव न होता छाटणी वा कटाई करावी काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

वन विभागाच्या क्षेत्रातील विभागाच्या परवानगी शिवाय कुणीही एक पत्ता सुध्दा तोडूच शकत नाही. मात्र येथे वेगळीच परिस्थीती पहावयास मिळते आहे.तेंदुपत्ताची ना लिलाव प्रक्रिया झाली; ना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव; कुणालाही लिलाव झालेच नसतांनाही कोंढाळा जंगल परिसरात ‘प्रुनिंग’ करण्यात येणे म्हणजे ‘हे काय चालले’ आहे.जंगल परिसर कुणाच्या अधिपत्याखाली आहे.ज्यांची जबाबदारी आहे.जंगलाच्या रक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे होते.मात्र याठिकाणी वेगळीच परिस्थीती निर्माण झाली असल्याने याबाबत वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक यांना व वरिष्ठांना तक्रार करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!