Tuesday, June 16, 2026
Homeदेसाईगंजतुमच्या ग्रामपंचायतीचा 'या' कामाशी काहीही संबंध नाही....!- असे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार...

तुमच्या ग्रामपंचायतीचा ‘या’ कामाशी काहीही संबंध नाही….!- असे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार म्हणतो तेव्हा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके (संपादक)

देसाईगंज :- मागील गेली दोन वर्षे कोरोनाने थैमान घातला होता.कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले होते.सर्वच विभागातील व स्वराज्य संस्थांतील विकास कामे ठप्प स्वरूपात पडली होती.कोरोणा कालावधी संपला व सर्वच विभागातील,स्थानिक स्वराज्य संस्थांतील विकास कामांचा हल्ली धडाका सुरू झाला.विकास कामांचा धडाका तर सुरू झाला; मात्र काही कामे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाहेरच्या व्यक्तिंद्वारे आणून विकास कामांचा गाजावाजा केला जातो आहे.अशातच ग्रामपंचातींच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती न देता गुपचूप कामे सुरू करून; संबंधित कामाविषयी माहितीची विचारणा केली असता,तुमच्या ग्रामपंचायतीचा ‘या’ कामाशी काहीही संबंध नाही.आमची यंत्रणा वेगळी आहे.तुमच्याकडे कशाला कागदपत्रे हवीत.असे अधिकारी,कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदार बतावणी करतो; तेव्हा असे हे अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदार आपल्या चुट्टी वरून हात फिरवीत असल्याचे समजावे.

महत्वाचे म्हणजे,ज्या गावात विकासाच्या नावावर कामे आणली जातात; त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव घेणे आवश्यकच असतो.मात्र याला अपवाद म्हणून काही विकास कामे विना ग्रामपंचायतीच्या ठरावानुसारही आणली जातात. अशीच विना ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आणलेल्या विकास कामांच्या बाबतीत ‘तुमच्या ग्रामपंचायतीचा यामध्ये काहीही संबंध नाही’.असे म्हणणे कितपत योग्य आहे.कामे कुठूनही आणा जसे,दिल्ली,मुंबई, कोलकाता व इतर ठिकाणांहून विकास काम करणे कुठे आहे; ज्या गावाचे वा ग्रामपंचायतीचे नाव पुढे केले आहे तिथेच ना?मग संबंधित ग्रामपंचयतीमध्ये त्याचा लेखाजोखा व इतरही माहिती असणे आवश्यक आहे.अन्यथा विकास कामांचे नाव पुढे करून गावात कुणीही कामे आणा आणि कसेही कामे करून;खिसे गरम करून,चालते बना.काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना माहितीची जाण नसते वा काहीजण माहिती असूनही माहीत नसल्याचे भासवित असल्याने ‘चलता है चलने दो,खाता है उसको ओर खाणे दो’अशी अवस्था झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!