Thursday, June 25, 2026
Homeमुंबईतर पुढील दोन वर्षे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार...

तर पुढील दोन वर्षे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-दहावी बारावी बोर्डाची परीक्षा म्हटले की,अभ्यास कमी व टवाळक्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.अशातच ऐन परीक्षा आली की,अभ्यास न करणारे विद्यार्थी कॉपी करून परीक्षेची उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यातच काहीजण परीक्षेत मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा हॉलमध्ये नेऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न करतात.आता अश्या कॉपी बहाद्दर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे परीक्षेत चाप बसावा, यासाठी येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.विद्यार्थ्यांनी ती पाळली नाही तर ते दोन वर्षे परीक्षेला बसू शकणार नाहीत.या परीक्षांमध्ये मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावरील बंदी कायम असून एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले तर त्याला पुढील दोन वर्षे परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येणार आहे.यापूर्वी,अशा प्रकरणांमध्ये एका वर्षाच्या बंदीची तरतूद होती.परीक्षेत पारदर्शकता ठेवण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीबीएसईने सोशल मीडियावर परीक्षेशी संबंधित अफवा पसरवण्याच्या कृत्यालाही अनुचित साधन नियमांत समाविष्ट केले आहे.एखादा विद्यार्थी अफवा पसरवतांना आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,असा इशारा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!