Friday, November 7, 2025
Homeनागपूरडॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्या शासनाच्या विरोधात यल्गार 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्या शासनाच्या विरोधात यल्गार 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- अंबाझरी येथील २० एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गेल्या ६० वर्षापासून आरक्षित असलेली जमीन महाविकास आघाडी सरकार आणि आताची शिंदे,भाजप सरकारने खाजगी कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकली.खाजगी कंपनीने ताबा मिळताच ह्या आरक्षित जमिनीवरचे नागपूर महानगर पालिकेच्या मालकीचे डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन पूर्णतः उध्वस्त केले असल्याने झालेल्या अन्यायाच्या आणि दडपशाहीच्या विरुद्ध संपूर्ण आंबेडकरी समाज,दलित,मागासवर्गीय, संविधान प्रेमी नागरिक पेटून उठले आहेत. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या वतीने जन आंदोलन मागील 3 महिन्यापासून सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयावर स्मारक उध्वस्त करणाऱ्या गुंड कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश जिल्हाधकारी नागपूर यांचे आदेश असतांनाही FIR कां दाखल केली नाही ? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या गुन्हेगारांना पाठीशी कां घालत आहे.या मागणीसाठी व जाब विचाण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

सर्व जागृत नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वीे केला.मोर्चाचे नेतृत्व सामूहिक होते.मुख्य संयोजक किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी यांच्या नेतृत्वात एम.टी.डी.सी.चे प्रमुख नागपूर विभागाचे कांबळे यांना भेटून निवेदन देण्यात आले व त्यांना कळवण्यात आले की संबंधित विभागाचे सचिव यांचे हमीपत्र पत्र आम्हाला लेखी पाहिजे.दिवसभर आंदोलन केल्यावर सुध्दा शासन प्रशासन अधिकारी ऐकत नसल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण करून रात्र भर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेवून आंदोलन एम.टी.डी.सी.कार्यालयातच सुरू राहिले. शासन,प्रशासन,अधिकारी यांना नमावे लागले.लगेच रात्री १० वाजता मुख्य सचिव महाराष्ट्र यांचा फॅक्स विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या नावे आला आणि सात दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिल्याने  आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनात आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!