Friday, August 28, 2026
Homeनागपूरडॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्या शासनाच्या विरोधात यल्गार 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्या शासनाच्या विरोधात यल्गार 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- अंबाझरी येथील २० एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गेल्या ६० वर्षापासून आरक्षित असलेली जमीन महाविकास आघाडी सरकार आणि आताची शिंदे,भाजप सरकारने खाजगी कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकली.खाजगी कंपनीने ताबा मिळताच ह्या आरक्षित जमिनीवरचे नागपूर महानगर पालिकेच्या मालकीचे डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन पूर्णतः उध्वस्त केले असल्याने झालेल्या अन्यायाच्या आणि दडपशाहीच्या विरुद्ध संपूर्ण आंबेडकरी समाज,दलित,मागासवर्गीय, संविधान प्रेमी नागरिक पेटून उठले आहेत. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या वतीने जन आंदोलन मागील 3 महिन्यापासून सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयावर स्मारक उध्वस्त करणाऱ्या गुंड कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश जिल्हाधकारी नागपूर यांचे आदेश असतांनाही FIR कां दाखल केली नाही ? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या गुन्हेगारांना पाठीशी कां घालत आहे.या मागणीसाठी व जाब विचाण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

सर्व जागृत नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वीे केला.मोर्चाचे नेतृत्व सामूहिक होते.मुख्य संयोजक किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी यांच्या नेतृत्वात एम.टी.डी.सी.चे प्रमुख नागपूर विभागाचे कांबळे यांना भेटून निवेदन देण्यात आले व त्यांना कळवण्यात आले की संबंधित विभागाचे सचिव यांचे हमीपत्र पत्र आम्हाला लेखी पाहिजे.दिवसभर आंदोलन केल्यावर सुध्दा शासन प्रशासन अधिकारी ऐकत नसल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण करून रात्र भर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेवून आंदोलन एम.टी.डी.सी.कार्यालयातच सुरू राहिले. शासन,प्रशासन,अधिकारी यांना नमावे लागले.लगेच रात्री १० वाजता मुख्य सचिव महाराष्ट्र यांचा फॅक्स विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या नावे आला आणि सात दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिल्याने  आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनात आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!