Tuesday, March 25, 2025
Homeकोंढाळाजगाचा पोशिंदा सापडला महागाईच्या विळख्यात..- शेती झाली न परवडणारी; शेतीचे उत्पादन जैसे...
spot_img

जगाचा पोशिंदा सापडला महागाईच्या विळख्यात..- शेती झाली न परवडणारी; शेतीचे उत्पादन जैसे थे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देशाचा नाही तर जगाचा पोशिंदा म्हटले जाणाऱ्या शेतकरी बांधवांची अवस्था बिकट स्वरूपाची झाली आहे.शेती मध्ये पाहिजे तेवढे उत्पन्न होतांना दिसून येत नाही.लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी अशी अवस्था शेतकरी बांधवांची झाली असल्याने सध्याच्या काळात महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.दिवसेंदिवस महागाईचा वणवा वाढत चालला आहे.यामधे शेतकरी होरपळत आहे.डिझेलची,पेट्रोलची दरवाढ सातत्याने होत आहे.दोन वर्षांत रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत.किटकनाशक औषधीचे दर वाढत चालले आहेत.शेतीत उत्पादन मात्र जेवढे आहे तेवढेच आहे.मात्र याचा आर्थिक फटका शेतकरी कुटुंबांना बसत आहे.पूवीच्या काळात शेतीला मोठे महत्व होते.एका शेतकऱ्याजवळ २० ते ५० एकर शेती असायची त्यावर कुटुंबाचा गाडा शेतकरी ओढत असायचा.

शेतकरी कुटुंबात आता नातेवाईकांची संख्या वाढत चालली आहे.शिवाय शेतीचे चार पट ते पाच पट तुकडे पडत आहेत.शेतकऱ्याच्या लोकसंख्येच्या मानाने निव्वळ शेतीवरच कुटुंबाचा खर्च चालविणे आता अवघड जात आहे.त्यामुळे शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांना न परवडणारा झाला आहे.काही शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन शहरात उच्च पदावर विराजमान झाले आहेत.मात्र काही कुटुंबे अजूनही शेतीवरच अवलंबून असल्याचे वास्तव चित्र नजरेसमोर प्रत्यक्ष दिसून येत आहे.

शेतीला जोडधंदा करुनही पाळीव जनावरांवरही रोगराईचे संकट येत आहे.उत्पादन कमी मात्र उत्पादन खर्च जास्त वाढत आहे.शेती व्यवसायासोबत पशुपालनाचा व्यवसायही तोट्यात येत आहे. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. पूर्वीसारखे पशुधनही शेतकऱ्याजवळ नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे.शेतीचे उत्पादन मात्र जेवढे आहे तेवढेच असून शेतमालालाही पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल आता दुसऱ्या व्यवसायाकडे वाढलेला दिसून येतो.मात्र शेतकरी बांधवांची अवस्था ‘जैसे थे’ पहावयास मिळत असल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक दिसून येतात.सततची नापिकी,अस्मानी संकट,किडीचा प्रादुर्भाव अशा विळख्यात शेत्या सापडल्याने काय करावे?असा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे उभा येऊन ठाकला आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!