Tuesday, September 8, 2026
Homeचंद्रपूरजंगलातून शेळ्या घरी परतल्या; पण 'तो 'परतलाच नाही..

जंगलातून शेळ्या घरी परतल्या; पण ‘तो ‘परतलाच नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वन्यजीव हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे.एक महिना लोटत नाही; तोच कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात नागरिकांनी जीव गमावल्याची घटना उघडकीस येत आहे.नुकतेच शुक्रवार २२ मे २०२६ रोजी जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केल्याची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली होती. सदरची घटना ताजी असतांनाच आता चिमूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.जंगल परिसरात शेळ्या चराईसाठी नेलेल्या शेळ्या घरी परतल्या; पण शेळीपालक घरी परतलाच नाही.यात वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल,रविवार ३१ मे रोजी उघडकीस आली.सदरची घटना ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या बाळापूर-तळोधी वनपरिक्षेत्राच्या नेरी उपवन क्षेत्रातील बद्री पहाडी जंगल परिसरात घडली.दिलीप जानबा नन्नावरे वय ४५ वर्षे,रा.मोटेगाव, ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीपालकाचे नाव आहे.
दिलीप नन्नावरे शेळ्या चराईसाठी जंगल परिसरात जायचे.नेहमीप्रमाणे रविवारी सकाळच्या सुमारास शेळ्या घेऊन जंगलात गेले होते.काही वेळाने शेळ्या घरी परतल्या; पण नन्नावरे हे घरी परतलेच नाही.बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने घरच्यांनी मोबाईलवर संपर्क साधला.वारंवार फोन लावूनही फोन उचलत नसल्याने काहीतरी घटना घडली असावी,असा संशय घरच्यांना आला.त्यामुळे कुटूंबीय तसेच गावातील काही नागरिकांनी जंगल परिसरात जाऊन शोधाशोध केली असता जंगलात फाटलेले कपडे आढळून आले.पुढे जाऊन शोध घेत असतांनाच ५०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेहच आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार,वन विभागाचे पथक व चिमूर पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर रुग्णालयात पाठवला.मृताच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.घटनेने परिसरात धाकधूक वाढली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!