Sunday, September 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.....

चंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.. – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,मंगळवार ३ मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण पहावयास मिळणार आहे.या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचे काम तसेच अंधश्रध्देला खतपाणी घातले जात असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने(अंनिस)ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही,असे असतांना देखील राष्ट्रीय वाहिन्या आणि सोशल मिडियावर सातत्याने ग्रहण विषयी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. एका बाजूला चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणारा आपला देश अजून ग्रहणासंबंधी अंधश्रद्धांना बळी पडतो आहे.त्यामुळे,ग्रहणाबाबत अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात,डॉ.हमीद दाभोलकर,मिलिंद देशमुख,नंदिनीं जाधव,रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर अण्णा कडलास्कर,डॉ.अशोक कदम, मुंजाजी कांबळे,प्रकाश घादगिने,मुक्ता दाभोलकर,फारुख गवंडी प्रवीण देशमुख आदींनी केली आहे.चंद्रग्रहण ही एक साधी खगोलीय घटना आहे.त्यामध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा किरणे तयार होत नसतात.दर सहा महिन्यानंतर पृथ्वी,चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करणे असेल उदाहरणार्थ भाजी चिरणे कात्री वापरणे हे सर्व करीत राहण्यास कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो.गर्भवती स्त्रीने झोपले किंवा पाय क्रॉस करून बसले किंवा चाकू कात्री वापरली असे काहीही केले तरीही गर्भावर यत्किंचितही दुष्परिणाम होत नसतो हे लक्षात घ्यावे; असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!