Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीघोटाळेबाजांची ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांना राज्य करता येणार नाही- वामन मेश्राम
spot_img

घोटाळेबाजांची ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांना राज्य करता येणार नाही- वामन मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- निवडणुकीत वापरली जाणारी ईव्हीएम मशीन हि घोटाळेबाजाची घोटळे मशीन आहे. ईव्हीएम मशीनद्वारे होणारी हेराफेरी नष्ट झाली पाहीजे.’व्होट हमारा,राज तुमारा नही चलेंगा’ त्यासाठी  ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांचे राज्य येणार नाही म्हणुन संघटित शक्तीच्या बळावर सुप्रिम कोर्टच आम्हाला न्याय मिळवून देवू शकतो.यासाठी ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रवादी परिवर्तन यात्रा कन्याकुमारी ते काश्मिर पर्यत सतत सुरु राहणार आहे.आज सामाजीक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या बुद्धीजीवी व राजनैनिक नेत्यांना इव्हिएम मशीनच्या गडबड घोटाळ्याची माहीती मिळत आहे.म्हणुन कांग्रेस आणि भाजपाने केलेले हे पाप मी धुवून काढून बहुजनांचे राज्य निर्माण करण्याकरीता ईव्हीएम घोटाळ्याची माहीती देत संपूर्ण देश ढवळून काढत आहे.अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन बामसेफ नेते वामन मेश्राम यांनी भारत मुक्ती मोर्चाच्या ईव्हीएम भंडाफोड परिवर्तन यात्रे प्रसंगी केले आहे.

ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन सभा इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे डॉ.शिवनाथ कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक वामन मेश्राम यांचा उपस्थितीत पार पडली.याप्रसंगी भन्ते सारीपुत , डॉ.गौतम नगराळे चंद्रपूर,ॲड.माया जमदाळे दिल्ली, भारत मुक्ती मोर्चाचे गडचिरोली जिल्हा प्रमुख जर्नाधन तांकसाडे,रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर,विलास निंबोरकर,आनंद गावंडे,भागवत मॅडम चंद्रपूर आदींनी ईव्हिएम मशीन घोटाळाबाबत चे पितळ उघडे पाडण्या संदर्भात समायोचित भाषणे दिली. 

सभे प्रसंगी डॉ.कुंभारे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,बहुजनांच्या अनेक समस्या आहेत.त्या या माध्यमातून वामन मेश्राम यांनी सोडवून वंचित घटकांना न्याय मिळवून द्यावा व ईव्हिएम मशीन हद्दपार करणे गरजेचे आहे.असे म्हटले आहे.

कार्यक्रमाचे संचालन भोजराज कान्हेकर तर प्रास्ताविक प्रा.अशोक वंजारी यांनी केले.आभार प्रदर्शन प्रमोद राऊत यांनी मानले.भारत मुक्ती मोर्च्याच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!