Tuesday, March 18, 2025
Homeऔरंगाबादग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव....- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 
spot_img

ग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव….- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

औरंगाबाद : – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आमठान गावातील ग्रामपंचायतीने घेतलेल्या अनोख्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नात नववधूसाठी ग्रामपंचायतीच्या तर्फे एक पैठणी देण्यात येणार आहे.शिवाय जावयाचा देखील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.मुलींच्या साठी अनेक योजना येत्या काळात गावात राबविण्यात येणार असल्याचा मानस ग्रामपंचायतीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

आमठान ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावाची सध्या  जोरदार चर्चा आहे.चर्चा ही व्हायला हवी; असा गावातील मुलींच्या आपुलकीचा विषय म्हणजे माहेरची साडी.ग्रामीण भागातील प्रत्येक नववधूच्या नशिबात पैठणी साडी नसते.त्यामुळेच आमठान या ग्रामपंचायतीने गावातील सर्व नववधूंना लग्नात अहिर म्हणून पैठणी साडी देण्याचा ठराव परित करण्यात आला आहे.तर नवरदेवाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या दहा टक्के उत्पन्नातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी आमठान येथे पंढरीनाथ मोहनाजी सोमासे यांची कन्या उज्वला व आकाश यांचा विवाह पार पडला.सोहळ्यामध्ये आमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचा कोकीळाबाई मोरे,उपसरपंचा विमलबाई लोखंडे,ग्रामपंचायतीच्या सदस्या सोनूताई खरात, कमलबाई कदम,सिंधुबाई,रुखमनबाई मोरे,देवशाला तायडे,सीमा जाधव यांच्या हस्ते नववधूस माहेरची साडी म्हणून पैठणीचा अहेर करण्यात आला.असा अनोखा उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असावी अशी सर्वत्र चर्चा आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!