Friday, June 26, 2026
Homeऔरंगाबादग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव....- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 

ग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव….- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

औरंगाबाद : – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आमठान गावातील ग्रामपंचायतीने घेतलेल्या अनोख्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नात नववधूसाठी ग्रामपंचायतीच्या तर्फे एक पैठणी देण्यात येणार आहे.शिवाय जावयाचा देखील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.मुलींच्या साठी अनेक योजना येत्या काळात गावात राबविण्यात येणार असल्याचा मानस ग्रामपंचायतीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

आमठान ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावाची सध्या  जोरदार चर्चा आहे.चर्चा ही व्हायला हवी; असा गावातील मुलींच्या आपुलकीचा विषय म्हणजे माहेरची साडी.ग्रामीण भागातील प्रत्येक नववधूच्या नशिबात पैठणी साडी नसते.त्यामुळेच आमठान या ग्रामपंचायतीने गावातील सर्व नववधूंना लग्नात अहिर म्हणून पैठणी साडी देण्याचा ठराव परित करण्यात आला आहे.तर नवरदेवाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या दहा टक्के उत्पन्नातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी आमठान येथे पंढरीनाथ मोहनाजी सोमासे यांची कन्या उज्वला व आकाश यांचा विवाह पार पडला.सोहळ्यामध्ये आमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचा कोकीळाबाई मोरे,उपसरपंचा विमलबाई लोखंडे,ग्रामपंचायतीच्या सदस्या सोनूताई खरात, कमलबाई कदम,सिंधुबाई,रुखमनबाई मोरे,देवशाला तायडे,सीमा जाधव यांच्या हस्ते नववधूस माहेरची साडी म्हणून पैठणीचा अहेर करण्यात आला.असा अनोखा उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असावी अशी सर्वत्र चर्चा आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!