Wednesday, June 10, 2026
Homeऔरंगाबादग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव....- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 

ग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव….- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

औरंगाबाद : – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आमठान गावातील ग्रामपंचायतीने घेतलेल्या अनोख्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नात नववधूसाठी ग्रामपंचायतीच्या तर्फे एक पैठणी देण्यात येणार आहे.शिवाय जावयाचा देखील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.मुलींच्या साठी अनेक योजना येत्या काळात गावात राबविण्यात येणार असल्याचा मानस ग्रामपंचायतीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

आमठान ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावाची सध्या  जोरदार चर्चा आहे.चर्चा ही व्हायला हवी; असा गावातील मुलींच्या आपुलकीचा विषय म्हणजे माहेरची साडी.ग्रामीण भागातील प्रत्येक नववधूच्या नशिबात पैठणी साडी नसते.त्यामुळेच आमठान या ग्रामपंचायतीने गावातील सर्व नववधूंना लग्नात अहिर म्हणून पैठणी साडी देण्याचा ठराव परित करण्यात आला आहे.तर नवरदेवाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या दहा टक्के उत्पन्नातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी आमठान येथे पंढरीनाथ मोहनाजी सोमासे यांची कन्या उज्वला व आकाश यांचा विवाह पार पडला.सोहळ्यामध्ये आमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचा कोकीळाबाई मोरे,उपसरपंचा विमलबाई लोखंडे,ग्रामपंचायतीच्या सदस्या सोनूताई खरात, कमलबाई कदम,सिंधुबाई,रुखमनबाई मोरे,देवशाला तायडे,सीमा जाधव यांच्या हस्ते नववधूस माहेरची साडी म्हणून पैठणीचा अहेर करण्यात आला.असा अनोखा उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असावी अशी सर्वत्र चर्चा आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!