Sunday, April 19, 2026
Homeऔरंगाबाद विद्यार्थ्यांना साडे दहा नंतर परीक्षा केंद्रात 'नो एंट्री'- पेपर फुटीला बसणार चाप

 विद्यार्थ्यांना साडे दहा नंतर परीक्षा केंद्रात ‘नो एंट्री’- पेपर फुटीला बसणार चाप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) :- दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असुन परीक्षेदरम्यान होणारी पेपरफुटी टाळण्यासाठी आता विद्यार्थ्यांना परीक्षेला ३० मिनिटेआधीच प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर प्रवेशास बंदी घालण्यात आली असल्याचे सुचनापत्र बाेर्डाने जारी केले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी व बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे.बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी ३ मार्च रोजी गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याचे समोर आल्याने सदर प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाली आहेत.त्यामुळे मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दुपरी २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यावेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांस परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही,असे मंडळाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सदर गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. तसेच संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस स्टेशनला फिर्याद क्र.००३७ अन्वये अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही याची विद्यार्थी,शिक्षक,पालक व सर्व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी,असेही पत्रात म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!