Sunday, April 19, 2026
Homeऔरंगाबादग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव....- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 

ग्रामपंचायतीकडून नवरीला पैठणी देण्याचा घेतला ठराव….- महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची चर्चा 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

औरंगाबाद : – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आमठान गावातील ग्रामपंचायतीने घेतलेल्या अनोख्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नात नववधूसाठी ग्रामपंचायतीच्या तर्फे एक पैठणी देण्यात येणार आहे.शिवाय जावयाचा देखील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.मुलींच्या साठी अनेक योजना येत्या काळात गावात राबविण्यात येणार असल्याचा मानस ग्रामपंचायतीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

आमठान ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावाची सध्या  जोरदार चर्चा आहे.चर्चा ही व्हायला हवी; असा गावातील मुलींच्या आपुलकीचा विषय म्हणजे माहेरची साडी.ग्रामीण भागातील प्रत्येक नववधूच्या नशिबात पैठणी साडी नसते.त्यामुळेच आमठान या ग्रामपंचायतीने गावातील सर्व नववधूंना लग्नात अहिर म्हणून पैठणी साडी देण्याचा ठराव परित करण्यात आला आहे.तर नवरदेवाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या दहा टक्के उत्पन्नातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी आमठान येथे पंढरीनाथ मोहनाजी सोमासे यांची कन्या उज्वला व आकाश यांचा विवाह पार पडला.सोहळ्यामध्ये आमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचा कोकीळाबाई मोरे,उपसरपंचा विमलबाई लोखंडे,ग्रामपंचायतीच्या सदस्या सोनूताई खरात, कमलबाई कदम,सिंधुबाई,रुखमनबाई मोरे,देवशाला तायडे,सीमा जाधव यांच्या हस्ते नववधूस माहेरची साडी म्हणून पैठणीचा अहेर करण्यात आला.असा अनोखा उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असावी अशी सर्वत्र चर्चा आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!