Friday, April 17, 2026
Homeनागपूरकारसह तीन तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू...

कारसह तीन तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कारसह तीन तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात काल,सोमवारच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.घटना घडताच बघ्यांनी गर्दी केली.घटनेबाबत पोलिसांना कळताच बुटीबोरी पोलिसांकडून तातडीने  बचावकार्य सुरू होते.कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. रस्त्यालगतच असलेल्या विहिरीला कठडा नसल्याने रस्त्यावरून अनियंत्रित कार थेट विहिरीत गेली.कार विहिरीत कोसळल्यानंतर गाडीतील तरुणांना बाहेर पडता आले नाही.तिघेही आतच अडकले होते.त्यामुळे तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.बुटीबोरी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.तरुणांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.रात्रभर बचावकार्य सुरू होते.अपघात घडण्यामागचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नाही.मात्र,कार शिकत असतांना चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मृतांची नावे अद्यापही स्पष्ट व्हायची असल्याने नावे कळू शकली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!