- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच
माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक ठिकाणी जड गोण्यांची चढउतार करतांना कामगारांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास सहन करावा लागतो.अनेकदा ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलतांना त्यांच्या शरीरावर ताण येतो.यामुळे पाठदुखी,सांधेदुखी आणि इतर गंभीर व्याधी निर्माण होण्याची शक्यता वाढते.विशेषतः वय वाढल्यानंतर या त्रासाचे प्रमाण अधिक वाढते.त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गोण्यांच्या वजनावर मर्यादा घालणे अत्यावश्यक असल्याने राज्य सरकारने कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.त्यानुसार,आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन कमाल ५० किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत कामगार संघटना,व्यापारी संघटना,कामगार विभाग,तसेच किराणा बाजार आणि दुकाने मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच हा निर्णय अंतिम करण्यात आला.त्यामुळे हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य सरकारने बाजार समित्यांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.सर्व शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी गोण्यांचे वजन ५० किलोच्या मर्यादेत ठेवावे यासाठी जनजागृती करण्यास सांगितले आहे.तसेच बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची चढउतार होणार नाही,याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
- Advertisement -

