Wednesday, April 23, 2025
Homeमुंबईआता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..
spot_img

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला आहे.त्यातच आज,सोमवार १७ मार्चला राज्यातील नव्या वाळू धोरणाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.सर्वप्रथम भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाळू धोरणाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते.मुनगंटीवारांच्या या प्रश्नांवर नव्या वाळू धोरणानुसार अर्ज केल्यापासून १५ दिवसांत तहसीलदारांनी घरकुलधारकांना वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत आहोत.१५ दिवसांत वाळू उपलब्ध न केल्यास तहसीलदारांवर कारवाई केली जाईल.नव्या वाळू धोरणात हे नमूद असेल,तसेच तक्रारीसाठी निश्चित एक पोर्टल तयार केले जाईल, अशीही माहिती बावनकुळे यांनी दिली.येत्या ८ दिवसांत नवे वाळू धोरण लागू करण्यात येणार असून घरकुलांना ५ ब्रास मोफत वाळू दिली जाईल,असेही त्यांनी म्हटले.भंडारा जिल्ह्यातील महसूल खात्यातील अधिकारी बेजबाबदार आणि निष्काळजीपणे वागत असल्याचाही प्रश्न उपस्थित झाला होता.त्यावर, संपूर्ण अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याची वाट लावली आहे, त्यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करू,असे आदेशच महसूल मंत्र्यांनी दिले आहेत.तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बोलून गृह खात्याचीही चौकशी लावू,असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे देशात पहिली..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच यूपीएससी.परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करून नशीब अजमावू पाहतात.यंदाच्या यूपीएससी...

पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार; २० जणांचा मृत्यू झाल्याची भीती..

उद्रेक न्युज वृत्त :-जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे आज,मंगळवारी २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैसरन मैदानावर ...

आता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे सिईओ पुलकित सिंग तर विवेक जॉन्सन बीडचे जिल्हाधिकारी.. – राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील बदल्यांचे सत्र संपता-संपेना..! राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या(IAS) बदल्या करण्यात आल्या आहेत.अशातच आज,मंगळवार २२ एप्रिलला राज्यातील पाच आयएएस...

मित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेलेल्या ब्रम्हपुरीच्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी…

उद्रेक न्युज  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरात वास्तव्यास असणारा २२ वर्षीय तरुण मित्राला सोडून देण्यासाठी दुचाकीने देसाईगंजला(वडसा)गेला.मात्र,परतीच्या वाटेवर असणाऱ्या देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!