Tuesday, March 18, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तआज पहाटे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा...
spot_img

आज पहाटे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज पहाटे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची घटना छत्तीसगड-तेलंगणा सीमा भागात घडली.तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
आज,रविवारी १ डिसेंबरच्या पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला.तसेच, चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.चालपाका जंगल परिसरात ही चकमक झाली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.सुरक्षा दल इथुरुनाग्राममधील चालपाकाजवळील जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते.यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात
सात नक्षलवादी ठार झाले.पोलिसांचे पथक अजूनही
परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान,या चकमकीत ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांची ओळख
पटली आहे.यामध्ये कुरसम मंगू,एगोलाप्पू मल्लैया,
मुसाकी देवल,मुसाकी जमुना,जय सिंह,किशोर आणि कामेश यांचा समावेश आहे.पोलिसांनी त्यांच्या
ताब्यातून अनेक आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!