- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गेल्या अनेक दशकापासून जंगल परिसरात दारोदार भटकून हिंसक कारवाया,जाळपोळ, हत्या व इतर गनिमी काव्याने उपद्रव माजविणाऱ्या नक्षली संघटनेने सर्व मागील कारनामे मागे सोडून आता संविधानाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र दिसू लागले आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील संपूर्ण नक्षलवादाचे ३१ मार्च २०२६ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय घेतलेला असतांनाच आज,मंगळवार ३१ मार्च रोजी तब्बल नऊ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले.दसरी उर्फ पिडे सन्नू वेको वय ३५ वर्षे,रामजी अडमा पोटाम वय ४० वर्षे व शांती वंजा वड्डे वय ४० वर्षे तिन्ही नक्षली क्षेत्रिय समिती(एसीएम)सदस्य होते.तर मनकू पोड्याम,सरिता वेलकम,लखमी कुंजाम,नंदे मडे,राकेश मज्जी व सुक्की कुंजाम अशी अन्य आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे असून शासनाने या सर्वांवर ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रिय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रिय समितीत कार्यरत होते.सध्या गडचिरोली जिल्ह्यात सहा सशस्त्र नक्षली शिल्लक आहेत.त्यातील,जयराम गावडे हा एकमेव सदस्य गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असून,अन्य पाचजण छत्तीसगडचे रहिवासी आहेत.मात्र,त्यांच्या कुठल्याही हालचाली गडचिरोली जिल्ह्यात दिसत नसल्याचे गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले.शांती वंजा वड्डे हिने एके-४७ रायफल आणि जिवंत काडतुसांसह,तर सुक्की कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह आत्मसमर्पण केले.त्याचबरोबर,महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कुमनार आणि गुंडापुरी जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.यात एके-४७, एसएलआर, डेटोनेटर,वॉकीटॉकीसह इतर साहित्यांचा समावेश आहे.
- Advertisement -

