Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअभिनंदन महाराष्ट्र सरकार,भ्रष्टाचारात जोरदार प्रगती -विजय वडेट्टीवार

अभिनंदन महाराष्ट्र सरकार,भ्रष्टाचारात जोरदार प्रगती -विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच एनसीआरबी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो जी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे.या संस्थेने देशभरातील भ्रष्टाचाराचा अहवाल जाहीर केला आहे.यात महाराष्ट्र राज्य देशात भ्रष्टाचारात अव्वल स्थानावर असल्याने काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज,शुक्रवार ३ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधत उपरोधिक टोला लगावला आहे.महाराष्ट्राचा पारदर्शक कारभार एवढा चकचकीत आहे की,देशात महाराष्ट्राने भ्रष्टाचारात शिखर गाठले आहे.देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करत असतांना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच आहे. २०२३ मध्येही महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल ठरला असल्याचे एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे.२०२३ मध्ये देशभरात भ्रष्टाचाराची १ हजार १३९ प्रकरणे समोर आली.त्यातील तब्बल ७६३ प्रकरणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.एनसीआरबी अहवालानुसार देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आणि ते देखील सलग तीन वर्ष ही कामगिरी महाराष्ट्राने केली आहे.म्हणजे उत्तर प्रदेशला पण महाराष्ट्राने मागे टाकले आहे.स्वच्छ आणि पारदर्शक कामाचा ढोल बजावणाऱ्यांना त्यांच्या कारभाराचे सरकारी प्रमाणपत्र मिळाले आहे.त्यामुळे अभिनंदन महाराष्ट्र सरकार,जोरदार प्रगती,असे म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!