- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी उष्ण हवेचा मारा सुरु केल्याने थंड हवेसाठी कुलरशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच एका विद्यार्थिनीने वसतिगृहासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केल्याने वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे.आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे.ती नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहते.सध्या वाढत्या तापमानामुळे विदर्भात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे आकांक्षा व तिच्या मैत्रिणींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वसतिगृहासाठी कुलरची मागणी केली.तिच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने तात्काळ कुलर उपलब्ध करून दिले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढल्याची माहिती आहे.याचाच राग मनात धरून आता वसतिगृह प्रशासाने आकांक्षा उके हिलाच वसतिगृहातून हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे.यामुळे या गरीब विद्यार्थिनीच्या पायाखालची वाळू सरकली आहे.वसतिगृहाने आकांक्षा उके ही बाहेर नोकरी करते असा आरोप करत तिची हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे.तसेच तिच्याकडून ६ महिन्यांचा निवास व भोजनाचा खर्चही जमा करण्याची ताकीद दिली आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे.तसेच गरीब विद्यार्थिनीसोबत होणारा हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याचा आरोपही केला आहे.विजय वडेट्टीवार म्हणाले,नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतकरी कुटुंबातील एका विद्यार्थिनीने उन्हाच्या तीव्रतेत कूलरची मूलभूत सुविधा मागितली आणि त्यासाठी थेट मुख्यमंत्री स्तरावर तक्रार केली, त्यानंतरच तिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली,हा प्रकार अतिशय निंदनीय व
लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा असल्याचे म्हटले आहे.
- Advertisement -

