Tuesday, July 7, 2026
Homeमुंबईअखेर सरपंच संघटनेच्या आंदोलनाला आले यश... - सरपंच,उपसरपंच व सदस्यांचे वाढणार मानधन..

अखेर सरपंच संघटनेच्या आंदोलनाला आले यश… – सरपंच,उपसरपंच व सदस्यांचे वाढणार मानधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन सुरु होते. मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो सरपंच एकवटले होते. दरम्यान,आंदोलनाला यश आले आहे.ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.मंत्री महाजन यांच्या
मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात
आले आहे.सरपंचांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव
आठवड्यात मान्य करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी आश्वासन दिले आहे.
सरपंचांच्या मानधन वाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.ग्रामपंचायतींच्या निधीबाबत लवकरच तोडगा काढला जाईल,असेही महाजन यांनी प्रसंगी म्हटले आहे.मानधन अल्प आहे,त्यात वाढ करावी; अशी मागणी सरपंचांनी केली होती.येत्या ८ दिवसांत कॅबिनेट निर्णय होईल,असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.
ग्रामपंचायतीमधील छोटी कामे असतील,तर १५
लाखांपर्यंत कामे द्यावीत; अशी मागणी केली होती.
पण कोर्टाचा निर्णय असल्याने ३ लाखांपर्यंत कामे
देता येतात.त्यात देखील तोडगा काढला जाईल
असे महाजन यांनी म्हटले.इतर तांत्रिक मागण्या
आहेत; त्या सुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या
जातील.प्रमुख दोन्ही मागण्यांवर सरकार सकारात्मक
आहे.लवकरच त्यावर निर्णय होईल; असे महाजन
यांनी सांगितले.
सरपंचांना १५ हजार रुपये,उपसरपंचाला १० हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला ३ हजार रुपयांचे मानध मिळावे,ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा,पेन्शन,निश्चित वेतन लागू करावे,मुंबईत सरपंच भवनची स्थापना करावी,ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी म्हणावे,ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करुन वेतनिश्चिती करावी,संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे,यावलकर समितीचा अहवाल लागू करावा,संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा, ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊनविकासकामे करण्याचा अधिकार द्यावा; इत्यादी मागण्या घेऊन सरपंच संघटनांनी संप पुकारला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!