उद्रेक न्युज वृत्त :-अखेर भारताने तब्बल १२ वर्षाच्या कालावधीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आज,रविवारी ९ मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ षटकांत (ओव्हर) मध्ये २५२ धावांचे लक्ष्य गाठून विजयी पताका फडकवला.आज सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यानुसार न्यूझीलंडने २५१ धावा काढल्या होत्या. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली,कारण त्याने सलग दोन षटकांत दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना क्षेत्र स्थळाबाहेर (आऊट)केले होते.न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल याने ६३ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.त्यातच इंडिया टीमचे कर्णधार रोहित शर्माने खेळी करत ७६ धावा कुटल्या.श्रेयस ने ४८ धावा,केएल राहुल नाबाद ३४ धावा आणि अक्षर पटेलने २९ धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.. – अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

