Monday, July 27, 2026
Homeचंद्रपूरअखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच आज,मंगळवार ९ जून रोजी पाच तरुणांपैकी अद्याप तीन तरुणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे,नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचे वर्धा नदीच्या काठावर कपडे,चपला व मोबाईल आढळून आले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराच्या इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेले तन्मय पाथाडे वय १७ वर्षे,समय सोनटक्के वय १७ वर्षे,शिव केळझरकर वय १८ वर्षे,सनी आसामपिल्ली वय १८ वर्षे आणि रोहित बोबडे वय १९ वर्षे हे पाच मित्र काल सोमवारी दुपारच्या सुमारास म्हातारदेवीजवळील वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.बराच वेळ होऊनही मुले घरी परतली नसल्याने त्यांच्या पालकांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध करायला सुरुवात केली.या दरम्यान,काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तरुणांना नदीच्या दिशेने जातांना पाहिले होते.त्यानुसार,शोधमोहीम राबविण्यात आली असता वर्धा नदीच्या काठावर संबंधित तरुणांचे कपडे,चपला व मोबाईल आढळून आले होते. कपडे व इतर साहित्य नदीकाठावर सापडल्याने ते नदीत उतरले असावेत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असावेत,अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यानुसार,स्थानिक प्रशासन,पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत आज मंगळवारी सकाळच्या सुमारास शोधमोहीम सुरू केली असता दुपारपर्यंत तीन तरुणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!