Sunday, April 19, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरविजांचा तांडव; अंगावर विज पडून एकाच तालुक्यातील चार जणांचा मृत्यू.. - दोन...

विजांचा तांडव; अंगावर विज पडून एकाच तालुक्यातील चार जणांचा मृत्यू.. – दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
छत्रपती संभाजीनगर :-जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस कोसळल्याने बऱ्याच ठिकाणी शेतकरी शेतबांधावर जाऊन पेरणी करू लागलेत.अश्याच प्रकारे आज, शनिवार १४ जून रोजी पेरणी व इतर कामे करण्यासाठी शेतबांधावर गेलेल्या एकाच तालुक्यातील चार जणांचा अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.चार जणांपैकी दोन सख्ख्या भावांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.सदरच्या घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात घडल्या.
पहिल्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या सारोळा गावातील दोन सख्ख्या भावंडांचा अंगावर विज कोसळून मृत्यू झाला आहे.दोन्ही भावंडे आपल्या आईसह शेतात पेरणीसाठी गेली होती.शेतात उभे असतांना अचानकपणे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ते एका झाडाच्या आडोशाला गेले.तितक्यातच विजांचे कडकडाट सुरू होऊन वीज दोघांच्याही अंगावर कोसळली.यात रोहित राजू काकडे वय २१ वर्षे व यश राजू काकडे वय १७ वर्षे हे दोघेही जागीच गतप्राण झाले.
दुसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या मोढा बुद्रूक येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर शेतातून घरी जात असतांना ४८ वर्षीय रंजना बापू शिंदे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला.
तिसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या पिंपळदरी गावातील दोघे भाऊ शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे विजांचे कडकडाट होऊन २८ वर्षीय
शिवराज सतीश गव्हाणे याच्या अंगावर वीज कोसळली.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जीवन सतिश गव्हाणे गंभीर जखमी झाला.त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.आज शनिवारी एकाच तालुक्यातील चार जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे.त्यातच अन्वी शिवारातील शेतकरी नारायण सांडू बांबर्डे यांच्या शेतात वीज कोसळून एक म्हैस ठार झाली.तर दुसऱ्या घटनेत मांडणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्याही शेतात वीज कोसळून तीन वासरे ठार झालीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!