- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-सध्या वाघ आणि इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकजण जीव गमावत आहेत. अश्यातच “वाघाने खाल्लन-वाघाने खाल्लन” अशी बोंब आज सोमवारच्या सकाळी दहा वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.लागलीच वन विभागाचे कर्मचारी,पोलीस पाटील व ग्रामस्थांनी गावालगतच्या जंगल परिसरातील घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी करतात तो काय? सर्वजण अफवांचा बाजार म्हणून गेल्या पावली गावाकडे परतायला लागले.
सध्या ग्रामीण भागात तेंदूपाने तोडण्याचा हंगाम सुरू आहे.त्यामुळे,ग्रामीण भागातील अनेक कुटुंब सकाळच्या सुमारास तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात जात आहेत.अश्याच प्रकारे देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील पुरुषांसह महिला वर्ग आज सकाळच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेले होते.सकाळपासून तेंदूपाने तोडण्यात व्यस्त असतांनाच गावातील एकाने खुद्द आपल्याच पत्नीला वाघाने खाल्लन म्हणून गावात बोंब मारली.सदरची बोंब गावात वाऱ्यासारखी पसरताच संवेदनशील बाब म्हणून कुणी वनरक्षक यांना फोन घुमावला,तर कुणी पोलीस पाटील व इतरांना माहिती द्यायला लागले.त्यातच,तरुण मंडळीसह ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने घटनास्थळाकडे धाव घेतली.विशेष म्हणजे,कोंढाळा जंगल परिसर व आजूबाजूच्या परिसरात यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात बऱ्याच नागरिकांनी जीव गमावला असल्याने बोंब खरी आहे की काय? पाहण्यासाठी जंगल परिसराकडे निघाले.परिसरात पाहतात तर काय?तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेले पुरुष व महिला वर्ग घराकडे परतीच्या वाटेवर होते.ग्रामस्थांनी घटनेबाबत विचारणा केल्यावर ‘काहीपण उगीच अफवा पसरवता’ असे म्हणून सगळ्यांना गावाकडे परतायला लावले.
कोंढाळा व उसेगावच्या जंगल परिसरात एक वाघ,एक वाघीण व इतर हिंस्त्र प्राणी असल्याची माहिती आहे. हिंस्त्र प्राणी एकाच ठिकाणी न राहता परिसरात घुमजाव करत असतात.त्यामुळे,जंगल परिसरात जातांना नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
- Advertisement -

