उद्रेक न्युज वृत्त :-यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंता कायम आहे.हवामान विभागाने ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.जर पावसाळ्यातही अशीच अनिश्चित परिस्थिती राहिली,तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधीपासूनच योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे.मिश्र पीक पद्धती,आंतरपीक आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.अनेक भागातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे.कमी पावसाच्या परिस्थितीत उत्पादन टिकवण्यासाठी आधुनिक शेती पद्धतींचा वापर करण्यावरही भर दिला जात आहे.अश्यातच भारतीय हवामान विभागाने आज पुढील २४ तास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

