Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय जंतनाशक दिन; उद्याला गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९० हजार ९९४...

राष्ट्रीय जंतनाशक दिन; उद्याला गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९० हजार ९९४ बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील आरमोरी व चामोर्शी तालुके वगळता इतर १० तालुक्यात १ ते १९ वयोगटातील एकूण १ लाख ९० हजार ९९४ बालकांना उद्या,बुधवार दिनांक-४ डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात उद्या ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार असून या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून शिक्षण विभाग व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ९९४ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया,पोटदुखी,उलट्या,अतिसार,मळमळ,भूक मंदावणे आदी आजारांचा धोका उद्भवतो.त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी; असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राष्ट्रीय जंतनाशक दिनाची तयारी केली असून,वैद्यकीय अधिकारी, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील १७१३ अंगणवाडी केंद्रे,११९० जिल्हा परिषद शाळा,८४ आश्रमशाळा,९२ खाजगी शाळा,१४ महाविद्यालय,१५१ सरकारी महाविद्यालय असे एकूण ३२४४ संस्थामधून मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.काही कारणास्तव ४ डिसेंबरला ज्या बालकांना जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा वंचित सर्व बालकांना १० डिसेंबरला मॉप-अप दिनी ही गोळी देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.
जंतामुळे मुलांमध्ये ॲनिमिया,पोटदुखी,उलट्या, अतिसार,मळमळ,भूक मंदावणे यासह कुपोषण,वाढ खुंटणे आदी आजारांचा मुलांना धोका असतो.त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे.आरोग्य विभागाकडून सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते.या मोहिमेदरम्यान १ ते १९ वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते,अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जंतनाशक दिनी १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ.अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.२ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ.गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते.६ ते १९ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ.गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.
बालकांच्या आरोग्याविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.
या ठिकाणी मिळते मोफत गोळी👇
अल्बेंडाझोल ही गोळी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जाते.आरोग्य उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी,शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!