- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने आज,मंगळवार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी एक शासन निर्णय जारी केला असून,या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०२४ पासून सुधारण करण्यात आली आहे.या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.हा वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ ने दिले आहे.राज्य शासनाच्या या निर्णयानुसार हा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाणार आहे.अर्थात १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या सात महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२५ च्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाणार आहे.
- Advertisement -

