- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शासन स्तरावरून राज्यात रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे.महसूल विभागाद्वारे यासाठी मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पीकपेरा नोंदविता येणार आहे; अशी नोंद नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना शासन योजनांचा लाभ तथा नुकसानभरपाई मिळणे कठीण होणार आहे.
या प्रकल्पात सुरुवातीला १ डिसेंबर ते १५ जानेवारी, असा दीड महिना शेतकरी स्तरावर नोंद घेतली जाणार आहे.त्यानंतर १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत सहायकांमार्फत ई-पीक पाहणी होणार आहे.यासाठी ॲप डाऊनलोड करून डिजिटल क्रॉप सर्वेक्षणामध्ये गटाच्या हद्दीवर जाऊन जोपर्यंत पीक पाहणी करणार नाही,तोवर पिकांचे छायाचित्र काढता येणार नाही, शिवाय अपलोड करता येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांना थेट शेतावर जावून पेरणी केलेल्या पिकांची फोटो अपलोड करायची आहे.तसेच शेतशिवारातील झाडेही या माध्यमातून नोंदविता येणार आहेत.शेतकऱ्यांनी यासंबंधी दक्षता घेण्याची गरज आहे.पीकविमा,पीक कर्ज,नैसर्गिक आपत्तीची मदत,शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर पिकांची ऑनलाइन नोंदणी यासह अन्य महत्त्वाच्या कामांसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आलेली आहे.
पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत फोटो घेणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे.यामध्ये पिकांचे दोन फोटो घ्यावे लागतात.शिवाय गावासाठी नियुक्त सहाय्यक शेतकऱ्यांची मदत घेता येणार आहे.महसूल अधिकारी,शेतकरी स्तरावर झालेल्या ई-पीक पाहणीची पडताळणी करणार आहेत.
- Advertisement -

