उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून,येत्या,२०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे.त्यानुसार,सर्व विद्यार्थ्यांच्या अधिकृत नोंदींमध्ये आता आईचे नाव प्रथम नमूद केले जाणार आहे.विशेष म्हणजे,यापूर्वी वडिलांचे नाव प्रथम राहायचे.मात्र,आता आईचे नाव,वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव असा नवीन क्रम निश्चित करण्यात आला आहे.हजेरीपत्रक,गुणपत्रक,शाळा सोडल्याचा दाखला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आणि शाळा सोडल्याचा दाखला(प्रवेश निर्गम उतारा)या सर्व कागदपत्रांवर आईचे नाव नमूद केले जाईल.त्याचबरोबर, विभक्त-घटस्फोटित पालक व दत्तक मुलांच्या बाबतीत परिस्थितीनुसार योग्य ती नोंद ठेवण्याची तरतूद करण्यात येणार आहे.सदरचा नियम शासकीय,अनुदानित आणि खासगी या सर्व शाळांमध्ये एकसमान लागू होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

