- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले आहे. खासदारांनंतर शिंदे गटाने मोर्चा आता आमदारांकडे वळवल्याची चर्चा सुरू झाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत यावे, आम्ही त्यांचे स्वागतच करू,असे म्हटल्याने विविध चर्चांना उधाण आले.यामुळे अनेकांनी विजय वडेट्टीवार हे शिवसेनेत जाण्याच्या बाता झोडल्या होत्या.त्यावर, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळवून लावले आहे.वडेट्टीवार यांनी म्हटले की,मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे.पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; त्यामुळे बदनामीचे राजकारण थांबवा.राज्यात शेतकरी, बेरोजगारी,महागाई,कायदा-सुव्यवस्था,महिला सुरक्षा, पायाभूत सुविधा अशा अनेक गंभीर प्रश्नांनी जनता त्रस्त आहे.या विषयांवर सरकारने उत्तर द्यावे,अशी अपेक्षा असतांना काही मंडळी मुद्दामून अफवा पसरवून आणि व्यक्तिगत बदनामी करून मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत.याविषयी त्यांनी
समाजमाध्यमातून भूमिका व्यक्त केली.निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे.महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला.त्यामुळे काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचे काम करतात.शिंदे गटात जाणार का? पक्ष प्रवेश करणार का? कोणाला भेटले का? अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जातात.काही पत्रकारही कोणताही तथ्य नसता प्रश्न विचारून मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रत करतात.ही पत्रकारिता नसून खोडसाळपणा आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे; असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

