- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-घर सोडून जाण्याचे आतापर्यंत अनेक किस्से ऐकले.पण,चक्क भाजी आवडली नाही म्हणून वाद झाला आणि अल्पवयीन मुलगा थेट दिल्लीला गेला. प्रसंगी नागपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला शोधून काढत कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याची घटना नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.१७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याची आई कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास राहतात.शुक्रवार ११ जुलैच्या रात्री मुलाच्या आईने जेवणासाठी भेंडीची भाजी बनवली.त्या रात्री अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या आईचे भेंडीच्या भाजीवरून भांडण झाले.मुलाला भेंडीची भाजी आवडली नसल्यामुळे त्याने खाण्यास नकार दिला.त्यामुळे आई मुलाला रागावली आणि याच रागातून त्याने चक्क घर सोडून थेट दिल्ली गाठली.घर सोडून निघून जातांना त्याने स्वतः जवळचा मोबाईलही स्विच ऑफ केला होता.त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता.कुटुंबीयाने मित्रमंडळी तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला.पण,मुलाचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.अखेर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली.कोतवाली पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे संवेदनशीलता बाळगत तात्काळ शोध मोहीम राबवली.१७ वर्षीय मुलाने मोबाईल स्विच ऑफ केल्यामुळे त्यासाठी सायबर सेल विभागाने युक्ती लढवत त्याच्या मोबाईलवर लिंक पाठवली.मुलाने मोबाइल सुरू करताच पोलिसांना त्याच्या मोबाईलचे लोकेशन मिळाले.मुलाचे लोकेशन मिळाल्यानंतर तो मथुराला असल्याचे पोलिसांना कळले.त्यानंतर तो दिल्लीला गेल्याचे लोकेशन मिळताच दिल्ली पोलिसांची मदत घेण्यात आली व नागपूर पोलिसांनी त्याला नागपुरात आले.कुटुंबीयांनी नागपूर पोलिसांचे कौतुक करतसत्कार केला.आजची तरुणाई क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येते.त्यामुळे आई-वडिलांनी करावे तरी काय? असा गहन प्रश्न जन्मदात्यांना पडू लागलाय.
- Advertisement -

