- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भाजीचा ठेला लावण्यावरून उफाळलेल्या वादातून भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना काल,गुरुवारी रात्री ९.४५ वाजेच्या दरम्यान नागपूर शहराच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीमधील प्रकाशनगर परिसरात गोविंद लॉनजवळ
घडली.झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकाच्या मानेला चाटून गोळी गेल्याने जखमी झाला.प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.सोहेल खान वय ३५ वर्षे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर भाजी विकत घेण्यासाठी गेलेल्या मो.सुलतान ऊर्फ मो.शफी याच्या मानेला चाटून गोळी गेल्याने जखमी झाला.घटनास्थळावर एक जिवंत काडतूसदेखील आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली व पळापळ झाली.
माहितीनुसार,काल रात्रीच्या सुमारास साडे नऊ ते पावणे दहा वाजे प्रकाशनगर परिसरात गोविंद लॉन जवळील बाजारात चार आरोपी गाडीने आले व त्यांनी तेथील ठेल्यांजवळ गाडी थांबविली.तेथील तरुणांना शाहरुख कुठे आहे,असे विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली.एकाने देशी पिस्तूल काढत गोळीबारच सुरू केला.त्यातील एक गोळी सोहेल खानला लागली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाला याची माहिती देण्यात आली.पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व सोहेलला मेयो इस्पितळात नेले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्यातच भाजी विकत घेण्यासाठी गेलेल्या मो.सुलतान ऊर्फ मो.शफी याच्या मानेला चाटून गोळी गेल्याने जखमी झाला.पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले होते.दरम्यान,या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
- Advertisement -

