उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.पावसाची अनिश्चितता आणि शेतीमालाला मिळणारे कवडीमोल दर यातच आता खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली आहे. विशेषतः खरीप हंगाम तोंडावर असतांना उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.कृषी केंद्र चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,यंदा कीटकनाशकांच्या किंमतीत १५ ते २० टक्के,तर बियाण्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.खताच्या गोणीमागे झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.कापूस,तूर आणि सोयाबीनच्या पेरणीपूर्वीच हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसावा लागत असल्याने,आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर भांडवल उभारण्याचे मोठे संकट आहे. त्यातच,अद्याप दमदार पाऊस न झाल्याने पेरणी करावी की थांबवावी? या विवंचनेत शेतकरी आहेत.खतांच्या किंमतीत झालेली वाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. उत्पादन खर्च वाढला असून शेतमालाचे भाव कमी आहेत.शासनाने खतांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी,अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

