Thursday, April 30, 2026
Homeमुंबईबच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा ‘रॉबिनहूड’ नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी बच्चू कडू यांच्यासोबत प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडू हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत होती.आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.काल बुधवारच्या रात्री मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीत पक्ष विलीनीकरण,तसेच भविष्यातील राजकीय भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा झाली.विशेष म्हणजे, ‘प्रहार’चा राजकीय पक्ष शिवसेनेत विलीन झाला असला तरीही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रहार’ संघटना मात्र स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.बच्चू कडू म्हणाले,आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी हाती घेतला आहे.काल परवा ज्या चर्चा झाल्या,आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे रोजगार हमी योजनेत घ्यावे,हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे.लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत.शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले,मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही.हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहोत,अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली. ‘प्रहार’ संघटनेकडून नेहमी सामाजिक कार्य सुरू असते.अमरावती जिल्ह्यातला अचलपूल विधानसभा मतदार संघ त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून ओळखला जातो.बच्चू कडू यांचे पूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू असून अमरावती जिल्ह्यातल्या बेलोरा गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दिव्यांग,अंध आणि अपंगांसाठी त्यांनी केलेले काम आणि वेगवेगळ्या धाटणीचे आंदोलने कायम चर्चेत असतात.त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काही काळ राज्यमंत्री म्हणून काम केले.विशेष म्हणजे,आज विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.भाजपसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे.अश्यातच आता एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेचे दोन उमेदवार घोषित केले आहेत.एक बच्चू कडू आणि दुसरे म्हणजे डॉ.नीलम गोऱ्हे यांची घोषणा करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!