उद्रेक न्युज वृत्त :-चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी लगतच्या नागपूर, भंडारा,गोंदिया व वर्धा जिल्ह्यात अजूनही मान्सून दाखल झालेला नसल्याचा अंदाज हवामान खात्याने पुरविलेला आहे.त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा मान्सूनशी संबंध न जोडता मुबलक जमिनीत ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका,असे आवाहन वेळोवेळी कृषी विभागामार्फत केले जात आहे.ऐन भर उन्हाळ्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे.कधी नव्हे एवढा पाऊस मे महिन्यात अनुभवायला आला.उन्हाळी हंगाम मान्सूनपूर्व पावसाने संकटात सापडला आहे.शेतीची कामे प्रभावित ठरली आहेत.मात्र हवामान तज्ज्ञांनी आता पाऊस उघडीप घेणार असल्याचं अंदाज पुरविल्याने शेतीची कामे आटोपायला नक्कीच मदत होणार आहे.कोरडवाहू शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे,अशा शेतकऱ्यांनीही मान्सूनचा अंदाज घेऊनच पुढचे पाऊल टाकावे.याचे कारणही असेच आहे की,एप्रिल महिना खूपच तापला.त्यामुळे पाणी पातळीत मोठी घट अनुभवायला मिळाली.ती तूट भरून काढण्यासाठी निसर्गाचा अंदाज अर्थात मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे.
पावसाने दळी मारली; मुबलक जमिनीत ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

