Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीपालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू स्वस्त धान्य दुकानातून काही कालावधीसाठी बंद झाल्याने मक्याचे करायचे काय?पोळी खायला गहू द्या न..! अशी आर्त हाक जिल्ह्यातील रेशनकार्डधारक लाभार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिली आहे.विशेष म्हणजे,राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यावर त्यांची विशेष कृपा आहे.जिल्ह्यात विविध प्रोजेक्ट,आरोग्य सेवा,विद्यार्थी वर्ग,शेतकरी,बेरोजगारी, अडी अडचणी व इतर अन्य विकासात्मक कामांचा धूमधडाका सुरू करण्यात आला आहे.मात्र,दैनंदिन आहारात वापरला जाणारा गहू सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून अचानकपणे गायब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आणि अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आहारात प्रामुख्याने गहू व तांदळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.बहुतांश नागरिक मक्याचा वापर नियमितपणे करत नसल्याने शासनाकडून मिळणाऱ्या या मक्याचे करायचे काय? असा सवाल उपस्थित करत अनेक लाभार्थ्यांनी मका घेण्यास नकार दर्शवून थेट विक्री करण्याचा सपाटा चालवला आहे.आम्हाला नेहमीच्या आहारासाठी गहू व तांदूळच उपलब्ध करून द्या,अशी मागणी केली जात आहे.विशेषतः स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य हे प्रत्यक्षात नागरिकांच्या गरजेनुसार असावे,अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा जरी असली तरीही शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीचा मूळ उद्देशच गरजूंना त्यांच्या गरजेनुसार अन्नधान्य उपलब्ध करून देणे आहे.त्यामुळे लाभार्थ्यांची ही रास्त मागणी लक्षात घेता,मक्याऐवजी गहू वितरित करण्यात यावा,अशी मागणी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!