Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनुसत्या मोफतच्या रेवड्या वाटाल तर काम कोण करेल- सर्वोच्च न्यायालय

नुसत्या मोफतच्या रेवड्या वाटाल तर काम कोण करेल- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या विविध राज्यात फुकट्या योजना म्हणजेच बऱ्याच योजनांच्या माध्यमातून वीज, प्रवास,अन्न व इतर बरेच काही मोफत दिल्या जात आहे. यामुळे अनेकजण सुखांगे होऊन ऐतखाऊ बनले आहेत. अश्याच प्रकारे तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशनच्या याचिकेवर आज,गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करतांना देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत,न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटले की,देशातील बहुतेक राज्ये महसुली तुटीत आहेत.ती विकासाकडे तसेच रोजगार निर्मितीकडे दुर्लक्ष करून मोफतच्या रेवड्या देत आहेत.नुसत्या मोफतच्या रेवड्या वाटाल तर काम कोण करेल? अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.
विशेष म्हणजे,तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशनच्या कंपनीने २०२४ च्या विद्युत सुधारणा नियमांमधील नियम २३ ला आव्हान दिले आहे.यात ग्राहकांच्या आर्थिक स्थितीची पर्वा न करता सर्वांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे.तामिळनाडू राज्य सरकार घरगुती ग्राहकांना प्रत्येक दोन महिन्यांत सुमारे शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देते,कोणत्याही अटीशिवाय म्हणजे ग्राहक कितीही वापर करो,पहिल्या शंभर युनिटसाठी बिल भरावे लागत नाही.यावर न्यायालयाने म्हटले की, गरिबांना मदत करणे ठीक आहे; पण सर्वांनाच मोफत सुविधा देणे योग्य नाही.कल्याणकारी योजनेअंतर्गत तुम्ही त्या लोकांना दिलासा द्या जे विजेचे बिल भरू शकत नाहीत.पण जे लोक पैसे भरण्यास सक्षम आहेत आणि जे नाहीत, त्यांच्यात कोणताही फरक न करता मोफत सुविधा देणे हे तुष्टीकरणाचे धोरण नाही का?” प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकार आणि इतर पक्षांना नोटीस बजावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!