Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील तिसाव्या सत्रात राजरत्न पेटकर व डॉ.मंदा पडवेकर विजयी…

नाट्यश्री कविता स्पर्धेतील तिसाव्या सत्रात राजरत्न पेटकर व डॉ.मंदा पडवेकर विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

उपक्रमाचे तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे तिसावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे.त्यात गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी राजरत्न पेटकर व चंद्रपूर येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ.मंदा पडवेकर या दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून,त्यांच्या अनुक्रमे “पावसासारखा पाऊस” व “तेथे कर माझे जुळती” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली असल्याचे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

राजरत्न पेटकर हे गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी असून ते एस.टी.महामंडळ गडचिरोली येथे वाहक पदावर कार्यरत आहेत.नुकत्याच  त्यांच्या ‘परिवर्तन’ या नाटकास एस.टी. महामंडळाच्या विभागीय स्पर्धेत निर्मीतीचे व अभिनयाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे.अनेक कविता व नाटकांचे लेखन त्यांनी केलेले आहे.तर डॉ.मंदा पडवेकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी आहेत.अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.या दोन साहित्यिकांना नाट्यश्रीच्या स्पर्धेत एकाच वेळी पुरस्कृत करण्यात आले आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी दोन्हींचे अभिनंदन केले आहे.

तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने स्वप्नील बांबोळे,गजानन गेडाम, सौ.संगीता ठलाल,सौ.प्रेमिला अलोने, यु.एन. राऊत, सौ.रोहिणी पराडकर,जयराम धोंगडे,वंदना सोरते,विलास टिकले,पुनाजी कोटरंगे, रंजना चुधरी तुळशीराम उंदीरवाडे,राजरत्न पेटकर, गणेश रामदास निकम,राजू सोनटक्के,मुरलीधर खोटेले,सुभाष धाराशिवकर,सोनाली रायपुरे,डॉ.मंदा पडवेकर, केवळराम बगमारे,पी.डी.काटकर,माधुरी अमृतकर,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,उपेंद्र रोहनकर,प्रभाकर दुर्गे,प्रियंका वाकडे,वामनदादा गेडाम,रेखा दिक्षित,ज्योत्स्ना बन्सोड,सुनिता तागवान,भावना रामटेके, मंदाकिनी चरडे,मिलींद खोब्रागडे,वसंत चापले व सुजाता अवचट इत्यादी कविंनी सहभाग नोंदविला होता. पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!