उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे एकोणविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी पत्रू हनुमंतू गोरंतवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या ” प्रारंभ” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पत्रू हनुमंत गोरंतवार हे पोंभुर्णा (जिल्हा- चंद्रपूर) येथील रहिवासी असून १०० च्या वर कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.त्यांचे नविन कविता संग्रह प्रकाशनाचे मार्गावर असून नुकत्याच प्रकाशित झालेल्या “रानगर्भ फुलत आहे” या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित असून सातत्याने कविता लेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या एकोणिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम घोंगडे,संतोष कपाले,वंदना सोरते,सुरज गोरंतवार, राहूल शेंडे,वसंत चापले,भिमानंद मेश्राम,हरिष नैताम, स्वप्नील बांबोळे,नरेंद्र गुंडेली, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, जितू निलेकार,मारोती आरेवार,गणेश रामदास निकम, तुळशीराम उंदीरवाडे,चरणदास वैरागडे,पुरुषोत्तम दहिकर,विलास जेंगठे,मिलींद खोब्रागडे, खुशाल म्हशाखेत्री,रेखा दिक्षित,डॉ.मंदा पडवेकर, सुजाता अवचट, मुर्लीधर खोटेले,पी.डी.काटकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

