उद्रेक न्युज वृत्त :-नवीन फौजदारी कायद्यांमुळे आता नागरिकांना देशभरात कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे.ई- तक्रारीवरून पोलिस प्राथमिक तपास सुरू करून पुरावे जमा करतील; मात्र त्यानंतर तीन दिवसांत पीडितांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करणे आवश्यक आहे.त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
नवीन फौजदारी कायद्यांमुळे आता देशभरात कुठूनही करता येणार पोलिसांत ई-तक्रार… – नव्या कायद्यात ऑन कॅमेरा घेण्याची तरतूद…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मोबाईलवर ‘Maharashtra Police- services for Citizen या संकेतस्थळावर नागरिकांना ई- तक्रार नोंदविता येते.मात्र तीन दिवसानंतर संबंधित ठाण्यात जाऊन एफआयआरवर सही मारावी लागते.
भारतीय दंड संहितेऐवजी भारतीय न्यायसंहिता असे नवीन कायदे-कलम १ जुलै २०२४ पासून देशात लागू झाले आहेत.त्यानुसार आता तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करता येणे अडचणीचे असेल तर ऑनलाईन तक्रार करता येते.
तक्रारकर्त्यांचा जबाब,त्या आधारे नोंद होणारे दखलपात्र गुन्हे,पुरावे गोळा करताना बंधनकारक असलेले पंचनामे,साक्षीदार आणि आरोपींचे जवाब,शोधमोहीम, झडती,जप्ती,अटक आदी सर्व प्रक्रिया ऑन कॅमेरा घेण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे.
झीरो एफआयआरद्वारे नागरिक कुठूनही आपली तक्रार नोंदवू शकतात.पुढे,तो गुन्हा संबंधित पोलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग होईल; याशिवाय ई-तक्रार करण्याची सुविधा या कायद्यांतर्गत आहे.ई- तक्रारीवरून पोलिस प्राथमिक तपास सुरू करून पुरावे गोळा करतील.तीन दिवसांत पीडित तक्रारदार याला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारीवर सही करणे आवश्यक आहे.त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल..
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

