Wednesday, April 15, 2026
Homeनागपूरनदीत पोहायला गेले अन् जीव गमावून बसले.. - १३ वर्षीय विध्यार्थ्यांचा बुडून...

नदीत पोहायला गेले अन् जीव गमावून बसले.. – १३ वर्षीय विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रामटेक तालुक्यातील महादुला येथे पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल,शनिवारी ७ सप्टेंबरला ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार,रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथील वृषभ राजेंद्र गाडगे व रोहन सुभाष साऊसाखडे वय १३ वर्षे,हे दोघेही श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय, महादुला येथे आठवीमध्ये शिक्षण घेत होते.शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.११ वाजताच्या सुमारास दोघेही नदीत उतरले.दोघांपैकी एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही बुडाला.गावातील पोहणाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते अपयशी ठरले.घटनेची माहिती सरपंच शरद डडुरे यांना मिळताच त्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना कळविले.त्यांनी तात्काळ एसडीआरएफ पथक घटनास्थळी पाठवले.पथकाने दोन बोटींच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.शोध मोहिमेत दोघांचेही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!