Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातून 'कौन बनेगा करोडपती' मध्ये झळकणार डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग...

गडचिरोली जिल्ह्यातून ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अतिदुर्गम,आदिवासीबहुल गडचिरोली
जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर शास्त्रीय पद्धतीने संशोधन करतानाच येथील बालमृत्यूच्या समस्येसह आरोग्याच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी कायम झटत आलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग सिनेजगताचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहारदार संचालनाने सजलेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात येत्या शुक्रवार दिनांक- १३ सप्टेंबर रोजी दिसणार आहेत.
सोनी वाहिनीवर अमिताभ बच्चन संचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे नाव प्रत्येकाच्याच तोंडी असते.अतिशय विनम्र पण खुमासदार पद्धतीने प्रश्न विचारणारे अमिताभ बच्चन आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासोबत वाढत जाणारे पैशांचे आकडे यातून हा कार्यक्रम रंगत जातो.आता या कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासह आपल्या दीर्घकालीन समाजसेवेचा प्रवास उलगडण्यासाठी बंग दाम्पत्याला या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या खेळात जिंकलेली रक्कम बंग दाम्पत्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होणारे डॉ.अभय बंग व राणी बंग द्वितीय दाम्पत्य आहेत.यापूर्वी या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे सहभागी झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!