Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली शहरात वाहतूक निर्बंध लागू; चार मार्ग मध्यरात्रपर्यंत बंद..

गडचिरोली शहरात वाहतूक निर्बंध लागू; चार मार्ग मध्यरात्रपर्यंत बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात होणाऱ्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने उद्या,मंगळवार १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत गडचिरोली-आरमोरी,चंद्रपूर,धानोरा व चामोर्शी या मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व ११६ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.या कालावधीत संबंधित मार्गावर दोन्ही बाजूंनी अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.मात्र रुग्णवाहिका,प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा,महावितरण,दुरसंचार व रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
सदर आदेशाचे काटेकोर पालन करावे,अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर भारतीय दंड संहिता १८६० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हादंडाधिकारी पंडा यांचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!