- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-छत्तीसगड राज्याच्या अबुजमाड परिसरात २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.त्यामुळे नक्षलवादी बिथरले असून त्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी संघटनांनी ११ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान स्मारक सभा व आंदोलनांचे आवाहन केले असल्याने जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावा,यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १० जुलै रोजी मध्यरात्रीपासून २४ जुलैच्या रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत शस्त्रे,दगड,स्फोटके, भडकाऊ साहित्य बाळगणे,घोषणा करणे,सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे,मिरवणुका काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे.यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतीही आंदोलनात्मक कृती करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.सदर जमावबंदी आदेश गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

