Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीत्वरा करा..! उरले केवळ पाच दिवस; अन्यथा राशन होणार बंद...

त्वरा करा..! उरले केवळ पाच दिवस; अन्यथा राशन होणार बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राशन दुकानांतून कोट्यवधी लाभार्थ्यांना मोफत राशनचा लाभ देण्यात येत आहे.अशातच काही बोगस लाभार्थीही राशन उचलीत असल्याने यावर शासनाने रामबाण उपाय शोधत ई- केवायसीचा फंडा वापरला आहे.त्यामुळे शासनाने ई – केवायसी राशन दुकानात करून घेणे अनिवार्य केले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता राज्य सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे.जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून घेतला जाईल व बोगस लाभार्थ्यांना चपराक बसेल.थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून,त्यानंतर स्वस्त धान्याचा लाभ १ नोव्हेंबर २०२४ पासून बंद होणार आहे.
थम्ब व्हेरिफिकेशनला केवळ पाचच दिवस उरले असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी स्वस्त धान्य सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत.मात्र,तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.त्यामुळे व्हेरिफिकेशन पूर्ण न झालेल्या शिधापत्रिकाधारकांचे स्वस्त धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.त्यामुळे लवकरात-लवकर लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी; असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!