Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीतूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ ही राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना आहे.या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असून कृषी उत्पादनवाढीसाठी विविध घटकांचा लाभ मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंतचे बियाणे असल्यास बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर तीन वर्षांपेक्षा अधिक व पाच वर्षांपर्यंतचे बियाणे असल्यास बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ३ हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जून २०२६ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.अर्जासाठी शेतकऱ्यांकडे आधार संलग्न फॉर्मर आयडी असणे आवश्यक आहे.अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टलमार्फत सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य(FCFS) या तत्त्वाचाही अवलंब करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत विक्रेत्यांमार्फत बियाण्यांचे वितरण करण्यात येईल.बियाणे पुरवठादार संस्थेच्या विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष ओळख पडताळूनच लाभ दिला जाणार आहे.तसेच एका शेतकऱ्याला या घटकांतर्गत कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठीच लाभ अनुज्ञेय राहणार आहे. यापूर्वी या घटकांतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील दोन वर्षे या योजनेसाठी पात्रता राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन दर्जेदार तूर बियाण्यांचा वापर करून उत्पादनवाढ साधावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!